Tuesday, October 12, 2010

हरणे म्हणजे सरणे नाही

हरणे म्हणजे सरणे नाही,
बरंच काही असतं बाकी.
एखाद्याच अपयशाने,
व्हायचं नाही एकाकी.

जिंकणारा  असतो एकटाच,
हरणाऱ्या सोबत सोबती.
सूर्य नाही बनता आले,
तरी चंद्र म्हणून उजळावे राती.

जरा घेतला विसावा,
म्हणजे काही दमलो नाही.
आयुष्य अखंड सराव आहे,
म्हणून विजयात रमलो नाही.

हरणेच देते पुन्हा संधी,
बरेच काही सुधारण्यासाठी.
नव्याने लढून लढाई,
विजयाची गुढी उभारण्यासाठी.

तिथेही पुन्हा हरलास तरी,
हिरमुसून जाऊ नकोस.
जिंकणाऱ्याला शुभेच्छा दे,
तिथेही मागे राहू नकोस.

जगताना जगावे असे कि,
मेल्यानंतरही रहावे काही.
आयुष्य हे सुंदर आहे,
त्याचा शेवट हे मरणे नाही.

.....अमोल

Monday, October 11, 2010

कहा ले चली जिंदगी

कहा ले चली जिंदगी,
कहा चला उम्र का कारवा,
बिते दिनो मी डुबा जाये,
उडत्या मनाचा पारवा.

क्षण हळवे गतकाळातील,
काही सुखाचे काही दुखातील.
कुणी देई अंगी शिरशिरी,
कुणी सुखदसा गारवा.

किती चाललो संकटातूनी,
जरी पडलो तरी उठतो त्यातुनी.
सोडून आलो अपेक्षा ज्या,
तिथे जाई मनाचा पारवा.

कधी वाटेवर थांबलो नाही,
चला अकेला मार्ग पे राही.
उजेड ना दिशांत दाही,
केवळ अंधाराचा मारवा.

धन, दौलत नि संपत्ती,
उद्या अचानक सारे सरती,
जपली मी माणसे केवळ,
त्या आठवणी करती हिरवा.

उधळली सारी मनाची दौलत,
दुख वाटण्याची होती सवलत.
जीवापाड जपणारी माणसे,
माझ्यासारखी मिळोत सर्वा.

अशात एक होती सोबती,
चालली माझ्याच वाटेवरती.
इथवर दिला आधार मला,
कशाची करता पर्वा.

वैभवात मी नांदलो जरी,
पाय राहिलेत जमीनीवरी.
विसरलो ना दिन कालचे,
वाढू दिले कधीही गर्वा.

आज इथे हा दिन ढळताना,
आयुष्याचा शेवट कळताना.
आठवती ते सारे प्रियजन,
जो थे जिते वक्त मे गवाँ.

बिछड गये दोस्त सारे,
जी रहे हे यादो के सहारे.
सकाळी जे पडले स्वप्न,
वाटले कि भेटलो काल वा परवा.

त्या जगण्याच्या उत्साहाला,
सलाम देते हि हवा,
कहाँ मे अकेला लढा,
साथ था मेरे अपना जहाँ.

.................अमोल