Thursday, May 19, 2011

smile please ........... ok !! "click "

तो तसा धीट होतानेहमीच असायचा.
seriousness  वागण्यात होताच,पण मात्र गोड हसायचा.
नेमकं त्या दिवशी मी त्याला रडताना पाहिलं,
पण आलेलं पाणीही फार काळ डोळ्यात नाही राहिलं.
ती वेळ तशी चांगलीच होती, त्याच्या बाळाच्या नामकरण विधीची,
पण नक्कीच त्यावेळी त्याला, गोष्ट आठवली असेल काही आधीची.

झालं हेच होतं कि, एक वर्षापूर्वी त्याचे वडील वारले होते,
काही महिन्यापूर्वीच तर त्याने स्वतःला त्यातून सावरले होते,
वडील असताना जवाबदार्याचं ओझं त्याच्यावर नव्हतं,
पण त्यानंतर मात्र त्याने स्वतःला parties , pickniks मधून आवरले होते.
काहीच तर माहित नव्हतं त्याला, सगळ्या जवाबदारया नव्या होत्या,
कोणीच नव्हतं त्याचवेळी सांगायला त्या गोष्टी, ज्या नेमक्या सांगायला हव्या होत्या.
आई तर त्याच दुखात दिनरात दिसायची,
ते tension कमी होतं कि काय म्हणून लग्नाच्या वयातली बहिण समोर असायची.

पण एके दिवशी अचानक आनंदाचा पाऊस पडला,
सुखावले सारे घरचे आणि तोही जो होता दुखाने पिडला.
ज्या गोष्टीसाठी अपार डॉक्टर्स, मेहनत एवढाच काय नवस केले होते,
सारं काही फळाला आलेलं, त्याच्या बायकोला दिवस गेले होते.
वडील वारल्याच दुख तर होतच मनात तसंच,
पण नव्या आनंदाने बदलून गेलं सारंच.
काळाच्या नियमाप्रमाणे दुखाचा होऊ लागला विसर,
तिला दिवस गेल्यानेच होता हा सारा असर.

हळू हळू काळ ओसरला नवा बाळ जन्मा आला,
तो सर्वांना सांगत होता मला मुलगा झाला.
हळूच कोणी त्याला म्हणाला तुझाच बाबा पुन्हा जन्मला.
बारश्याच्या दिवशी गाऱ्हाणे घालताना देवाला,
मनाचा हळवा कोपरा पुन्हा हेलावला.
तो नकळत बोलून गेला "बाबा तुम्ही हवे होते",
झोपलेल्या बाळाने तेव्हाच नेमके "ट्या ट्या" केले होते.
कोणीतरी म्हणालं  ऐकून सारं हे,
अरे बघ पुन्हा बाबाच आला आहे.
डोळ्यात आलेला थेंबही त्याने लगेच पुसला,
मी मात्र तो क्षण नेमका तेव्हाच टिपला.

smile please ........... ok !!  "click "


.....अमोल
 

सार्थ-व्यर्थ

कधी सार्थ वाटे मनाचे इशारे,
कधी वाटते आहे व्यर्थ हे सारे.

इच्छा झुरावी,स्वप्ने चुरावी,
अशी दुखे कुणाच्या का वाट्यास यावी?.
फुलांनी फुलुनी  दरवळावा गंध,
वेलीनी त्यांस  अलवार  हातात द्यावी.
जपावी ती सारी, द्यावा हळुवार स्पर्श,
पण नाजूक ती  अंगे  नये  कुस्करावी.
आनंदाचा ऋतू घेउनी उमलती फुले सारी,
गांधाविना वाटती शून्य वारे.

कधी दाटतो मेघ डोळ्यातुनी,
कंप पावे सुरांची रेघ आतुनी आतुनी,
जीव आतुर होतो, आस वेडावते.
सहन होत नाही, सर आसवांची वहाते.
कळ उठता उरात, कसे मग हसावे?,
चिंता ना करावी,कसे निवांत बसावे?.
आसुसलेल्या आकांक्षा जाती  विरघळूनी जेव्हा ,
नको वाटती तेव्हा जीवनाचे पसारे

कधी स्पर्श मोहाचा मोहरवूनी जातो,
आणि हर्ष प्रेमाचा मना हरवूनी गातो,
कधी टोचती काटे वाटेतील  उगाच,
कधी बोचतो  डंख मिठीतील वेगळाच.
बंद डोळ्यांना तेव्हा खरी जाग येते,
गाठ विश्वासाची जेव्हा सुटुनी पहाते.
जर का सावलीस श्राप असतो उन्हाचा,
कश्यास मग सजवू  जीवन  नश्वर असणारे.


.....अमोल