Saturday, October 5, 2013

समजूत

हि कविता नाही,
माझी आसवं आहेत.
परिस्थितीला भिउन,
कवचाखाली मान घातलेली,
भ्याड कासवं आहेत.

हि अक्षरांची फसवेगिरी,
संपूर्ण ध्यानात आहे.
सर्वच बाजूने फसलेला मी,
त्यांच्याशी तरी का लढू?,
माझी तलवार म्यानात आहे.






















मी लढू तरी कुणाशी ?,
मला उराशी ज्यांनी घेतले!!!.
परी माझा उर ना कळला त्यांना,
फसवा समजुनी मला,
दूर त्यांनी फेकले .

दाद मागु कुठे मी,
पडसाद हरवले सारे.
न्याय देणारे हि त्यांचेच,
आरोपही त्यांचेच,
माझ्यवर उगाच करडे पहारे.

समजवणारेच भेटले,
समजून घेणारे कुणीच नाही.
दूषणं लाऊन घेतली स्वतःला,
स्वताच्याच समजल्या त्या चुका,
ज्यांचा मी धनीच नाही.

……… अमोल

No comments:

Post a Comment