Tuesday, February 14, 2012

न सोडवता आलेला गुंता


आज  दुपारी  वेळ  जात  नव्हता  म्हणून  कपाटातली  जुनी  कंपास बाहेर  काढली,
आणि  मग  college मधल्या  कितीतरी आठवणी  जाग्या  झाल्या.
ते तुटलेलं टोपणछोट्या  डब्बीचं ढाकण,
काळवंडलेला  खोडरबर, थोटकी पेन्सील,
छाप पुसटलेली इंचपट्टी, friendship  चे  band ,
आयकार्डची लेस, पिक्चरच, बसच जुनं तिकीट,
कॅन्टीनची  बिलं आणि  किती काय.
आणि  हो  तो  महालक्ष्मी   मंदिरातून आणि  सिद्धिविनायक मंदिरातून,
माझ्यासाठी तू घेतलेले  ते  दोन  धागे,
कामावर जायला  लागल्यापासून या  साऱ्या आठवणी याच कंपासमध्ये बंद केलेल्या,
त्या आज उघडल्या,

ते दोन धागे  एकमेकांत गुंतले  होते,
गुंता  इतका  होता कि  टोकं खेचावीत  तर  मधली  गाठ घट्ट बसायची,
आणि  गाठी  सोडवाव्यात  तर टोकंच  हरवायची,
फार  प्रयत्न केला पण गुंता  काय सुटेचना,
आणि त्या पायी मलाही  काही  सुचेचना,
धागे  तोडण्याशिवाय पर्याय नव्हता.

तुझ्या  माझ्या बाबतीत देखील असंच झालं होतं,
दोन अनोळखी धागे एकमेकांत केव्हा  गुंतलो ते कळलंच नाही,
आपल्या  दोघांना जरी वेगळ व्हायचंच  नव्हतं,
पण समाजाला, घरच्यांना ते मान्य  नव्हतं,
त्यांनी तो  गुंता  सोडवू पाहिला तितका गुंता  आणखीनच  वाढत गेला,
तुझी माझी गाठ तितकीच घट्ट होत गेली,
नाना  प्रयत्न झाले पण त्यांनी हार  मानली  नाही,
शेवटी त्यांनी धागे तोडलेच,
किती  गाठी मारून स्वतःला जोडलं आहे  तू  आणि  मी हे  आपल्यालाच  माहिती,
"जात"   या  शुद्र  संकल्पनेवर  थुकावसं वाटून देखील,
त्या समोर झुकावं लागलं याची  खंत  वाटते आज.

मी  ते(निदानदोन घागे तसेच  ठेवले,
कंपास बंद  केली आणि झोपून  घेतलं,
संध्यकाळी  आमच्या  समाजाचा  मेळावा  आहे  त्यात  जायचं  आहे  "fresh "  होऊन


................अमोल