Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Sunday, April 1, 2012

शाप मेहंदीचा.


ज्यांना  मुलं होत  नाही  अश्या स्त्रियांना  समाज  वांझ  म्हणतो,पण  असा  शिविवाचक  शब्द  पुरुषांसाठी  नाही  कारण  समाज  कधी  यासाठी  पुरुषाला  दोषी  धरतच नाही,आणि  शब्द दिला  असेल  तर तो निपुत्रिक  असा  सोज्वळ  शब्द  दिला  आहे.
आता  जी  कविता  सादर  करीत  आहे  ती  एक  पुरुष  म्हणून  करणे  काहींना  योग्य  वाटणार नाही, पण  जरा  भाऊ,  बाप , मुलीचा  मामामुलीचा  काका  या  दृष्टीकोनातुना  बघितले  तर पुरुषपण  गळून  जाईल, आणि  प्रश्न  उरेल  कि  खरच  "ती"  जवाबदार  असते  का  या  सगळ्याला.
शाप  मेहंदीचा
 कुण्या  हातावर  रंगते  मेहंदी,
कुण्या  हातावर  मेहंदी  रंगतच  नाही.
सारा  दोष  सारे  देती  मेहंदीलाच,
हाताला  कुणी  दोषी  धरतच  नाही.

धर्म  सदा  रंगण्याचा  असे  मेहंदीचा,
हातातल्या  उर्जेने  चढे  रंग  मेहंदीचा,
पानापानाला  कुटून  बने  लेप  मेहंदीचा,
चढे  ना  रंग  हा  काय  गुन्हा  केवळ  मेहंदीचा ?
सारा  भोग  सारा  त्रास  मेहंदीच्या  नशिबाला,
असे  किती  सोसले  मेहंदीने  हे  नसे  हिशोबाला.

काल  परवाही  कुण्या  हातांनी  झाड  तोडून  टाकले,
म्हणे  असेच  भोग  ना  रंगणाऱ्या  मेहंदीने  भोगायला  हवे,
ज्या  हातांमध्ये  कुवत  नसेल  मेहंदी  रंगवून  घेण्याची,
मग  सांगा  का  नको  ते  हातही  तोडायला  हवे ?
मेहंदी  निमूट  सोसते  म्हणून  भोगते  हा  भोग,
किती  वर्षे  झाली  नाही  बारा  हा  समाजातला  रोग.

_____________________________________________________________________

................अमोल

Tuesday, February 14, 2012

न सोडवता आलेला गुंता


आज  दुपारी  वेळ  जात  नव्हता  म्हणून  कपाटातली  जुनी  कंपास बाहेर  काढली,
आणि  मग  college मधल्या  कितीतरी आठवणी  जाग्या  झाल्या.
ते तुटलेलं टोपणछोट्या  डब्बीचं ढाकण,
काळवंडलेला  खोडरबर, थोटकी पेन्सील,
छाप पुसटलेली इंचपट्टी, friendship  चे  band ,
आयकार्डची लेस, पिक्चरच, बसच जुनं तिकीट,
कॅन्टीनची  बिलं आणि  किती काय.
आणि  हो  तो  महालक्ष्मी   मंदिरातून आणि  सिद्धिविनायक मंदिरातून,
माझ्यासाठी तू घेतलेले  ते  दोन  धागे,
कामावर जायला  लागल्यापासून या  साऱ्या आठवणी याच कंपासमध्ये बंद केलेल्या,
त्या आज उघडल्या,

ते दोन धागे  एकमेकांत गुंतले  होते,
गुंता  इतका  होता कि  टोकं खेचावीत  तर  मधली  गाठ घट्ट बसायची,
आणि  गाठी  सोडवाव्यात  तर टोकंच  हरवायची,
फार  प्रयत्न केला पण गुंता  काय सुटेचना,
आणि त्या पायी मलाही  काही  सुचेचना,
धागे  तोडण्याशिवाय पर्याय नव्हता.

तुझ्या  माझ्या बाबतीत देखील असंच झालं होतं,
दोन अनोळखी धागे एकमेकांत केव्हा  गुंतलो ते कळलंच नाही,
आपल्या  दोघांना जरी वेगळ व्हायचंच  नव्हतं,
पण समाजाला, घरच्यांना ते मान्य  नव्हतं,
त्यांनी तो  गुंता  सोडवू पाहिला तितका गुंता  आणखीनच  वाढत गेला,
तुझी माझी गाठ तितकीच घट्ट होत गेली,
नाना  प्रयत्न झाले पण त्यांनी हार  मानली  नाही,
शेवटी त्यांनी धागे तोडलेच,
किती  गाठी मारून स्वतःला जोडलं आहे  तू  आणि  मी हे  आपल्यालाच  माहिती,
"जात"   या  शुद्र  संकल्पनेवर  थुकावसं वाटून देखील,
त्या समोर झुकावं लागलं याची  खंत  वाटते आज.

मी  ते(निदानदोन घागे तसेच  ठेवले,
कंपास बंद  केली आणि झोपून  घेतलं,
संध्यकाळी  आमच्या  समाजाचा  मेळावा  आहे  त्यात  जायचं  आहे  "fresh "  होऊन


................अमोल

Wednesday, December 7, 2011

श्रद्धा
















मी हि आस्तिक होतो,
माझीही नितांत श्रद्धा होती.
मी चूक केली अपेक्षेची,
नशिबात  उपेक्षेचीच रेष बहुधा होती.

मला  जे भेटले काही,
सांगण्यात आले की हा संचिताचा भाग आहे.
तू दिलेच काय देवाला ? याचा हिशेब सांग,
इथे श्रद्धा हि महाग आहे.

ते म्हणतात पाप पुण्याचं गणित होतं,
जगण्या साठी श्वास सुद्धा मोजून मिळतो.
सगळं काही ठरलेलं असतं आधीच,
आणि मृत्यू देखील वेळ योजून येतो.

मी कर्मयोगाचा भक्त आहे,
प्रयत्नवादातच  मी देव मानतो.
इथे मिळकतीला संचित म्हणतात,
आणि जो तो अप्राप्तालाच दैव म्हणतो.

हरेक हतबल आहे नियतीसमोर,
तिचं सोडा हो! ती फार गहन नि विशाल आहे.
इथे स्वताशी तरी कोण लढतय,
शरणागती पत्करतोय खुशाल आहे.

छान पांघरून  घालून ठेवलंय देवाला,
अज्ञानाच, आंधळेपणाच नि आळसाच.
गाभार्यात जायचीही तसदी नको असते,
म्हणून धन्य होतात दर्शन घेऊन कळसाच.

मला वाटत नाही हे खरं असेल,
कि देव नास्तीकांवर रागावलाय.
एकमेकांना दोष न देण्याचा तोंडी करार झालाय आमचा,
लेखीही करायचाय, पेपर मागवलाय.

ऐकलय कि देव हि कंटाळलाय या थोतांडाला,
त्याला हि चीड येते खोटेपणाची.
पण तरीही उभा आहे कमरेवर हात ठेऊन,
वाट बघतो आहे आणि एका तुकारामाची.


................अमोल

Sunday, November 13, 2011

एक दुर्लक्षित सुंदरी

जे  डोळ्यांना  भावतं  ते  आणि  तेच  सुंदर  मानणारे  आपण  विसरून  जातो  कि  सुंदरता  त्यापलीकडेही  असते,
हि  कविता  तश्याच  एका  सुंदरीची  जिचं  सुंदरपण तिच्या  दिसण्यात  नव्हतं तर  कर्तबगारीत  होतं,
एका  मोठ्या  हुद्द्यावर  काम  करणारा  माणूस  जेव्हा  कोरा  चेहरा  घेऊन  जगतो  तेव्हा  आपण  त्याला  कामाचा  ताण म्हणतो,
किंवा  त्यालाच  कर्तबगार  म्हणतोजवाबदार  म्हणतोहि  कविता  तश्याच  प्रकारे  जगणाऱ्या  एका  स्त्रीची  मग  आपण  तिला  सुंदर  का  म्हणू  नये ?
विश्वास  ठेवा  लचकणारी  कंबर  सुंदर  असतेच  पण  त्याहून  सुंदर  असते  घराचा  भार सोसणारी  कंबरबाकी तुम्ही  हुशार  आहातच.




तिचं  कुणी  नव्हतं  आणि   तीही  नव्हती  कुणाची,
ती  एकलीच   जगायची  ती  शक्ती  होती  मौनाची.

ती  स्वतःत  विस्कटलेली  इतरांकडे  लक्ष  नसायचा  तिचा,
तिला  गरज  होती  तेव्हा  कोणी  हातही  नव्हता मदतीचा.

निरागसपणा  चेहऱ्यावर  नव्हता  एक  राठपणा   आलेला,
पाठीवर  आभाळ  पेलून  तिचा  ताठ  कणा झालेला.

ती  चेहरा  वैगरे  झाकत  नसे  उन्हाला घाबरून बिबरुन,
उन्हालाच  घाम  फुटायचा  तिच्या  जवळ   आल्यावर  दरदरून.

तीही  होती  कधी  अल्लड , नाजूक ,  अगदी  मऊशार,
परिस्थितीच  करते  असा  कापसालाही  पेटता  अंगार.

तिला  लपून  बघायचीही   फारफार  भीती   वाटते,
आग  किती  भयाण  असते  हे  तिला  पाहिल्यावर  पटते.

ती  हसतच  नाही  कुणाशी  अगदी  रुक्ष  वाटते,
गर्दीत  उभी  असताना  अंधारातला वटवृक्ष  वाटते.

स्वतःला  जपताच  नाही  आलं  तिला  इतरांना जपता जपता,
घर  सुखात  ठेवण्यासाठी  तिचा  आनंदच हरवला  होता.

ती  जगत  होती  तिच्या  मागे  घेऊन  तिची  निंदा,
दोन  लहानग्या  पोटासकट अख्ख्या  घराची  पोशिंदा.

सुनं कपाळ , मोकळा  गळा ,  साधी  सलवार ,  हातात  रुमाल,
ती  रेखून  करत  होती  विस्कटलेल्या  आयुष्याची  वाटचाल.

तसं  सारंकाही  होतं  तिच्याजवळ   जे  लागतं   जगण्यासाठी,
नव्हती  ती  केवळ  तिला  आपलं  म्हणणारी  नाती.

मनाला  घालून  मर्यादा , बांधून  चौकट   ती  जगत  होती  कलंदर
सगळे  म्हणतात  तिला  राबस  पण मला दिसते  ती  सुंदर.


................अमोल