Sunday, August 25, 2013

असे जगावे आयुष्य कि,
आयुष्याची मजा यावी .
आयुष्यातून कंटाळ्याने,
आयुष्यभराची रजा घ्यावी .

आजंच  आता जगू,
उद्याचं काय ते उद्या बघु.
चिंता जावी अशी काही विसरून,
जसे फुल नकळत गळावे देठापासुन.
हि अवस्था मनाची  इतक्या सहजा व्हावी.













मनात उल्हासाचे इंद्रधनू,
पसरत राहावे क्षणोक्षणी.
आपला उत्साह पाहून,
आनंद व्हावा फुलाच्या मनी.
चैतन्याच्या बेरजेतून उदासीनता वजा व्हावी.

अमोल 

No comments:

Post a Comment