Sunday, November 13, 2011

एक दुर्लक्षित सुंदरी

जे  डोळ्यांना  भावतं  ते  आणि  तेच  सुंदर  मानणारे  आपण  विसरून  जातो  कि  सुंदरता  त्यापलीकडेही  असते,
हि  कविता  तश्याच  एका  सुंदरीची  जिचं  सुंदरपण तिच्या  दिसण्यात  नव्हतं तर  कर्तबगारीत  होतं,
एका  मोठ्या  हुद्द्यावर  काम  करणारा  माणूस  जेव्हा  कोरा  चेहरा  घेऊन  जगतो  तेव्हा  आपण  त्याला  कामाचा  ताण म्हणतो,
किंवा  त्यालाच  कर्तबगार  म्हणतोजवाबदार  म्हणतोहि  कविता  तश्याच  प्रकारे  जगणाऱ्या  एका  स्त्रीची  मग  आपण  तिला  सुंदर  का  म्हणू  नये ?
विश्वास  ठेवा  लचकणारी  कंबर  सुंदर  असतेच  पण  त्याहून  सुंदर  असते  घराचा  भार सोसणारी  कंबरबाकी तुम्ही  हुशार  आहातच.




तिचं  कुणी  नव्हतं  आणि   तीही  नव्हती  कुणाची,
ती  एकलीच   जगायची  ती  शक्ती  होती  मौनाची.

ती  स्वतःत  विस्कटलेली  इतरांकडे  लक्ष  नसायचा  तिचा,
तिला  गरज  होती  तेव्हा  कोणी  हातही  नव्हता मदतीचा.

निरागसपणा  चेहऱ्यावर  नव्हता  एक  राठपणा   आलेला,
पाठीवर  आभाळ  पेलून  तिचा  ताठ  कणा झालेला.

ती  चेहरा  वैगरे  झाकत  नसे  उन्हाला घाबरून बिबरुन,
उन्हालाच  घाम  फुटायचा  तिच्या  जवळ   आल्यावर  दरदरून.

तीही  होती  कधी  अल्लड , नाजूक ,  अगदी  मऊशार,
परिस्थितीच  करते  असा  कापसालाही  पेटता  अंगार.

तिला  लपून  बघायचीही   फारफार  भीती   वाटते,
आग  किती  भयाण  असते  हे  तिला  पाहिल्यावर  पटते.

ती  हसतच  नाही  कुणाशी  अगदी  रुक्ष  वाटते,
गर्दीत  उभी  असताना  अंधारातला वटवृक्ष  वाटते.

स्वतःला  जपताच  नाही  आलं  तिला  इतरांना जपता जपता,
घर  सुखात  ठेवण्यासाठी  तिचा  आनंदच हरवला  होता.

ती  जगत  होती  तिच्या  मागे  घेऊन  तिची  निंदा,
दोन  लहानग्या  पोटासकट अख्ख्या  घराची  पोशिंदा.

सुनं कपाळ , मोकळा  गळा ,  साधी  सलवार ,  हातात  रुमाल,
ती  रेखून  करत  होती  विस्कटलेल्या  आयुष्याची  वाटचाल.

तसं  सारंकाही  होतं  तिच्याजवळ   जे  लागतं   जगण्यासाठी,
नव्हती  ती  केवळ  तिला  आपलं  म्हणणारी  नाती.

मनाला  घालून  मर्यादा , बांधून  चौकट   ती  जगत  होती  कलंदर
सगळे  म्हणतात  तिला  राबस  पण मला दिसते  ती  सुंदर.


................अमोल

Friday, November 4, 2011

ऋतू आला थंडीचा साजिरा सोवळा
















ऋतू  आला  थंडीचा  साजिरा  सोवळा,
घन  बरसून  छान   सरला  पावसाळा.

हि  अवनी  कशी  दिसते  हिरवाईने  सजून,
येते  ऊनही  कसे  सजणीसम  लाजून,
नाही  घामाच्या  धारा,  ना  तीष्ण  उन्हाचा  झळा.

बीज  नात्यांचे  मोहरे  फुले  टपोरासा  दाणा,
सण  दसर्या  दिवळीने  झाला  आनंदही मना,
निराशेच्या  आसमंती  सजे  दिपांचा  सोहळा.

पहाटेच्या  थंडीत  लागे  गारठ्याची झळ,
अंगावर  असते   आईची  मऊ गोधडी  मखमल,
विरक्तीच्या  गावा  लागे  सोबतीचा  लळा.

येता  शहारून  अंग कुणी  असते  बिलगण्याला,
त्या  उबदार  मायेने  येते  नाविन्य  जगण्याला,
त्यात  अंगावरून  जातो  स्पर्श  मलमलता  कोवळा.

दाट  धुक्यात  जेव्हा  चाले  अनोळखी  वाट,
आणि  संगे  असतो  एक  आपुलकीचा  हात,
वाजवितो  पावा  त्यात  कृष्ण  मदन  सावळा.

.....अमोल


Monday, October 24, 2011

कुणी केली किती माया तरी वाटतो परका


















कुणी केली किती माया तरी वाटतो परका,
दुजेभाव मनातला सलतो सारखा.

मज वाटे कि प्रीत केवळ नसानसांतून धावे,
तसे नसे काही हे तर सारे फसवण्याचे कावे,
स्फटिक टोचती पाया फुटल्या हिरयांचे,
ते हिरे नव्हते होत्या नभातल्या तारका.

पुजत असतो ज्यांना मानून देव्हारयातली मूर्ती,
खरा भाव त्यांचा असतो  निजस्वार्थी,
चिखल होतो निष्ठेने वाहिल्या फुलांचा,
डोळ्यात झोंबतो भाळावरचा श्रद्धावंत भूक्का.

नफ्या-तोट्याचा सारा हा बाजार,
माया जमवण्याचा जडलेला आजार,
इथे बापच काढतो पोटच्या पोरीला विकाया,
तर कुण्या बापालाच आहे पोरापासून धोका.

वाटतो जो कुणी पुरया जीवनाचं आभाळ,
तोच करतो अखेर खरया  नात्यांची आबाळ,
धीर द्यायला आयुष्यभर असतो जो पाठीशी,
क्षणात सोडून साथ तो करतो पोरका.


जीव ओवाळून टाकतो खरा जयांवरी,
तोच खोल जखम देतो उरात अंतरी,
खंजीराची धार वार करताच नाही,
राग लपलेला असतो सुप्त मनातला मुका.

................अमोल

Tuesday, October 18, 2011

पहिल्यांदा काहीतरी बोलली माझी परी

आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी,
पहिल्यांदा  काहीतरी  बोलली  माझी  परी,
तिचे  बोबडे  बोल  मला  कळत  नव्हते  जरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

तिच्या  मऊशार  हातांच्या  मऊशार बोटांनी,
कुरवाळत  माझ्या  गालांना  बोलली  ती  ओठांनी,
स्वर्गसुख्खच   जणू  प्राप्त  झालं मला  माझ्या  घरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

ती  काय  बोलत  होती  तिलाच  काय  ते  ठाऊक,
तिच्या  बोलण्याच्या  सोहळ्यात  मी  मात्र  भाऊक,
नकळत  डोळ्यातून  बरसल्या  आनंदाच्या  सरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.
हि  बोबड्या  बोलांनी  काय  काय  मागेल,
माझ्यातला  बाप जागा होऊन त्या  स्वप्नांमागे  लागेल,
गांभीर्य  आलंय वागण्यात  सोडून सारी  मस्करी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

उरलेलं  आयुष्य  आता  फक्त  याच  शब्दांसाठी,
आणि  हीच  तर  बनेल  माझ्या  आधाराची  काठी,
मी  हि  वेड्याने  सजवली  क्षणभरात  स्वप्न न्यारी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

तिच्या  पंखांसाठी  हवं  आकाश सुद्धा  मोठ्ठं,
पण  माझ्या  घरट्याचं  अंगण  फारंच  छोट्ट,
तिच्यासाठीच   खर्च  करीन  सुख्ख  माझी  सारी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

मोठी  होऊन जेव्हा  मिळवत  राहील  यश,
गर्वाने  सांगेल  "maza   baba   is   the   बेस्ट",
आयुष्याची सार्थकता  तेव्हाच  होईल  खरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

........अमोल

Wednesday, September 14, 2011

बाजार


आपल्या  देशात  दारू बंदी  होत नाही कारण  सरकारला  त्यातून revenue  मिळतो हे  जरी  मान्य  केले, तरी प्रश्न  हा पडतो कि  शरीविक्रय करायला  लावणाऱ्यांची  दुकानं  का  बंद  होत  नाहीत  त्यातून सरकारला  काय  मिळतं ? हे  तर  उघड  सत्य  आहे कि  यात  कितीतरी   पांढरपेशा  पांघरलेल्या  समाजातलीसुद्धा   लोकं  दलालीवर  पोट  भरत आहेपण  याच  पायी  भारताच्या  खूप खूप  गरीब गावांतून लहान मुली, तरुणी  आणल्या  जातातबाजार  असला कि  खरेदी  विक्री  होणारच. पण जर का  बाजारच  बंद  केला  तर निदान  ज्यांची  इच्छा  नाहीये  ( असं काम करायची मुळातच कुणाची इच्छा नसतेच) तर त्या   तरी  वाचतील. हे जरी आपल्याला  वाटत  असलं कि हि गंभीर  बाब  आहे तरी पण फार मोठ्या  प्रमाणात यात शासनाने लक्ष घालायला  हवे, पण ज्यांनी लक्ष घालायचे  त्यांना  भ्रष्टाचार,  scam  , घोटाळे, खुर्ची बचाव अश्या  कामांपासून वेळ  भेटेल तर हेही  होईल कि.


हात  पाय  बांधलेले  तोंडात  बोळा  कोंबलेला,
सुन्न थरार  रात्र  अनखोलीत  अंधार  तुंबलेला.

हा  काय  माझा  गुन्हा  का  रंग  माझा  वेगळा,
मोकळ्या  अंगास  माझ्या  वासनांध  स्पर्श  झोंबलेला.

जीव  देऊ  पहिला  पण  तोही कुठे  ताब्यात  होता?
वेदनेचा  अंत  बघण्या  काळ  हि  खोळंबलेला.

हात  पाय  सोडून  त्यांनी रस्त्यावरी फेकले,
ओळखींच्यापैकी  कुणी  नव्हता तिथे  थांबलेला.

बंद  दाराने  घराच्या  सांगितले  सर्व  काही,
सहानुभूतीचा  हात  परका  वाटला  आंबलेला.

नाही  राम  वा  कृष्ण  कोणी  लाज  माझी  राखणारा,
बेअब्रूचा  डाग  माझ्या  अब्रूवरी  लोंबलेला.

केव्हा  पासून  मन  मारून  जगते  आहे  कसेतरी,
आणि  जगेन  जोवरी  आहे  आत्मा शरीरी  डांबलेला.

......अमोल

Wednesday, September 7, 2011

आता तुटली रे नाळ.


हि कविता त्या कोणी एकाची जो कोणी फार दूर निघून गेला बरंच काही मिळवण्यासाठी,
आणि इतका दूर झाला कि काहीच नाही उरलं पाठी पुन्हा स्वतःच असं गमावण्यासाठी. 
.
.
.
.


इथे नाही वेळ कुणा,
बोलण्यासाठी क्षणभर सुद्धा,
परकी सारी नाती,
आणि परका हा देश सुद्धा,
खोट्या खोट्या ऐश्वर्यासाठी,
सुटले स्वतःचे आभाळ,
आता तुटली रे नाळ.

नाही इथे प्रेम मिळत,
मिळतो फक्त पैसा,
खरी आपुलकीस मुकलो,
जसा जला विना मासा,
सारे मोठे शामियाने,
पण नात्यांची आबाळ,
आता तुटली रे नाळ.

इथे नाही सणवार,
नाही सुखदुखाना आकार,
वास्तव सारे विसरलो,
करताना स्वप्नां साकार,
मनी उरतो फक्त,
एक आठवणींचा गाळ,
आता तुटली रे नाळ.

परतीचे ढग आता,
खुणावतात पुन्हा,
पण देशी जाऊन सुद्धा,
नांदतो जसा पाहुणा,
कुणी नाही उरले तिकडे,
म्हणण्यासाठी बाळ,
आता तुटली रे नाळ.
परतताना पुन्हा पुन्हा,
ओलावतात डोळे,
वाटते कुणी थांबवावे,
पायात येतात गोळे,
पण कुणी नसतं निरोपासाठी,
कुणी म्हणंत नाही सांभाळ,
आता तुटली रे नाळ.

इथेच खितपत पडायचे,
सांभाळायचे इथलेच संस्कार,
दुरूनच करायचा रोज,
स्वतःच्या देशाला  नमस्कार,
सातासमुद्रा पलीकडूनच,
घालायची देवालाही माळ,
आता तुटली रे नाळ.

................अमोल