Sunday, April 1, 2012

शाप मेहंदीचा.


ज्यांना  मुलं होत  नाही  अश्या स्त्रियांना  समाज  वांझ  म्हणतो,पण  असा  शिविवाचक  शब्द  पुरुषांसाठी  नाही  कारण  समाज  कधी  यासाठी  पुरुषाला  दोषी  धरतच नाही,आणि  शब्द दिला  असेल  तर तो निपुत्रिक  असा  सोज्वळ  शब्द  दिला  आहे.
आता  जी  कविता  सादर  करीत  आहे  ती  एक  पुरुष  म्हणून  करणे  काहींना  योग्य  वाटणार नाही, पण  जरा  भाऊ,  बाप , मुलीचा  मामामुलीचा  काका  या  दृष्टीकोनातुना  बघितले  तर पुरुषपण  गळून  जाईल, आणि  प्रश्न  उरेल  कि  खरच  "ती"  जवाबदार  असते  का  या  सगळ्याला.
शाप  मेहंदीचा
 कुण्या  हातावर  रंगते  मेहंदी,
कुण्या  हातावर  मेहंदी  रंगतच  नाही.
सारा  दोष  सारे  देती  मेहंदीलाच,
हाताला  कुणी  दोषी  धरतच  नाही.

धर्म  सदा  रंगण्याचा  असे  मेहंदीचा,
हातातल्या  उर्जेने  चढे  रंग  मेहंदीचा,
पानापानाला  कुटून  बने  लेप  मेहंदीचा,
चढे  ना  रंग  हा  काय  गुन्हा  केवळ  मेहंदीचा ?
सारा  भोग  सारा  त्रास  मेहंदीच्या  नशिबाला,
असे  किती  सोसले  मेहंदीने  हे  नसे  हिशोबाला.

काल  परवाही  कुण्या  हातांनी  झाड  तोडून  टाकले,
म्हणे  असेच  भोग  ना  रंगणाऱ्या  मेहंदीने  भोगायला  हवे,
ज्या  हातांमध्ये  कुवत  नसेल  मेहंदी  रंगवून  घेण्याची,
मग  सांगा  का  नको  ते  हातही  तोडायला  हवे ?
मेहंदी  निमूट  सोसते  म्हणून  भोगते  हा  भोग,
किती  वर्षे  झाली  नाही  बारा  हा  समाजातला  रोग.

_____________________________________________________________________

................अमोल

Wednesday, March 7, 2012

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


ती  आई  आहे,
ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे,
ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे,
ती जन्म आहे, ती माया  आहे, तीच सुरुवात आहे, आणि  सुरुवात  नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे.












मी नव्या युगाची नारी, कुणा  घाबरणारी,
जे येईल मनात, ते आणि तेच करणारी.

एकविसाव्या शतकाची मी हि शिलेदार,
संकटांना झुकविण्यासाठी आता मी हि लढणार.
मी नाही केवळ कोमल कळी गंधित,
मी आही मर्दानी, खेळते खेळ रक्त रंजित.
मी जिजाऊ शिवबाची मार्ग दाखवणारी,
मी सावित्री युगाची अक्षर शिकविणारी,
मी राणी झाशीची हाती तलवार पेलणारी.

मी कधी होते मस्तानी शृंगार फुलविणारी,
कधी banded  queen अंगार खुलाविणारी.
मीच mother  teresa ममत्वासाठी  प्रिय,
मीच इंदिरा होते राजकारणी सक्रीय.
मीच किरण बेदी विजार घालून गुंड पकडणारी,
मीच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ नव्वारी नेसणारी

मी सौंदर्यवती अप्सरा, गोड शब्दांचा झरा,
पुरुषास पुरुषत्व सिद्ध करण्या आधार माझा खरा.
मीच जन्म देते अन भागवते पहिली भूक,
कधी पत्नी, कधी आई बनून क्षमा करते प्रत्येक चूक.
ज्यास देते अस्तित्व त्याच्याशीच माझी लढाई,
त्याच्या नजरी केवळ मी फक्त एक बाई.
जरी modern  झाले तरी मी तीच राबणारी, गोड खाऊ घालणारी.

कानास सतत mobile , खांद्यावरी जड laptop .
मी हि वावरते पुरुषासारखी घालून जीन्स top .
मी विसरत नाही संस्कार कधी शालीनतेचा,
पण पुरुषी डोळा सदा वेध घेई चारित्र्याचा.
माझ्या madam पणा मागे एक लपलेली असते आई,
अभिमान आहे मला कि मातृत्व पुरुषाकडे नाही.
मी आज नाही परावलंबी, नाही आधारासाठी धडपडणारी

माझीही असते धावपळ ह्या corporate  क्षेत्रात.
मीही काळीज टाकून येते मागे, जीव जणू कात्रीत.
मी हि आहे पुरुषाच्या खांद्यास खांदा लावणारी,
कसले ना बंधन आता घेतली उंचच उंच भरारी.
मी नाही आता अबला केवळ रडणारी.

मीच सरस्वती ज्ञानाची देवी,
मीच अभंग जनाईची ओवी.
मीच किरण सूर्याचे, मी तळपणारा दीप,
मीच अक्षर, मीच शाही, लेखणीची निप.
गवसली मला शिक्षणाची तलवार,
आकाशाला सुद्धा मी झुकविणार अलवार.
मी तीच, वणवा पेटवणारी राखेखालची चिंगारी.

माँ तुजे सलाम!!!

................अमोल

Tuesday, February 14, 2012

न सोडवता आलेला गुंता


आज  दुपारी  वेळ  जात  नव्हता  म्हणून  कपाटातली  जुनी  कंपास बाहेर  काढली,
आणि  मग  college मधल्या  कितीतरी आठवणी  जाग्या  झाल्या.
ते तुटलेलं टोपणछोट्या  डब्बीचं ढाकण,
काळवंडलेला  खोडरबर, थोटकी पेन्सील,
छाप पुसटलेली इंचपट्टी, friendship  चे  band ,
आयकार्डची लेस, पिक्चरच, बसच जुनं तिकीट,
कॅन्टीनची  बिलं आणि  किती काय.
आणि  हो  तो  महालक्ष्मी   मंदिरातून आणि  सिद्धिविनायक मंदिरातून,
माझ्यासाठी तू घेतलेले  ते  दोन  धागे,
कामावर जायला  लागल्यापासून या  साऱ्या आठवणी याच कंपासमध्ये बंद केलेल्या,
त्या आज उघडल्या,

ते दोन धागे  एकमेकांत गुंतले  होते,
गुंता  इतका  होता कि  टोकं खेचावीत  तर  मधली  गाठ घट्ट बसायची,
आणि  गाठी  सोडवाव्यात  तर टोकंच  हरवायची,
फार  प्रयत्न केला पण गुंता  काय सुटेचना,
आणि त्या पायी मलाही  काही  सुचेचना,
धागे  तोडण्याशिवाय पर्याय नव्हता.

तुझ्या  माझ्या बाबतीत देखील असंच झालं होतं,
दोन अनोळखी धागे एकमेकांत केव्हा  गुंतलो ते कळलंच नाही,
आपल्या  दोघांना जरी वेगळ व्हायचंच  नव्हतं,
पण समाजाला, घरच्यांना ते मान्य  नव्हतं,
त्यांनी तो  गुंता  सोडवू पाहिला तितका गुंता  आणखीनच  वाढत गेला,
तुझी माझी गाठ तितकीच घट्ट होत गेली,
नाना  प्रयत्न झाले पण त्यांनी हार  मानली  नाही,
शेवटी त्यांनी धागे तोडलेच,
किती  गाठी मारून स्वतःला जोडलं आहे  तू  आणि  मी हे  आपल्यालाच  माहिती,
"जात"   या  शुद्र  संकल्पनेवर  थुकावसं वाटून देखील,
त्या समोर झुकावं लागलं याची  खंत  वाटते आज.

मी  ते(निदानदोन घागे तसेच  ठेवले,
कंपास बंद  केली आणि झोपून  घेतलं,
संध्यकाळी  आमच्या  समाजाचा  मेळावा  आहे  त्यात  जायचं  आहे  "fresh "  होऊन


................अमोल