Tuesday, October 18, 2011

पहिल्यांदा काहीतरी बोलली माझी परी

आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी,
पहिल्यांदा  काहीतरी  बोलली  माझी  परी,
तिचे  बोबडे  बोल  मला  कळत  नव्हते  जरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

तिच्या  मऊशार  हातांच्या  मऊशार बोटांनी,
कुरवाळत  माझ्या  गालांना  बोलली  ती  ओठांनी,
स्वर्गसुख्खच   जणू  प्राप्त  झालं मला  माझ्या  घरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

ती  काय  बोलत  होती  तिलाच  काय  ते  ठाऊक,
तिच्या  बोलण्याच्या  सोहळ्यात  मी  मात्र  भाऊक,
नकळत  डोळ्यातून  बरसल्या  आनंदाच्या  सरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.
हि  बोबड्या  बोलांनी  काय  काय  मागेल,
माझ्यातला  बाप जागा होऊन त्या  स्वप्नांमागे  लागेल,
गांभीर्य  आलंय वागण्यात  सोडून सारी  मस्करी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

उरलेलं  आयुष्य  आता  फक्त  याच  शब्दांसाठी,
आणि  हीच  तर  बनेल  माझ्या  आधाराची  काठी,
मी  हि  वेड्याने  सजवली  क्षणभरात  स्वप्न न्यारी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

तिच्या  पंखांसाठी  हवं  आकाश सुद्धा  मोठ्ठं,
पण  माझ्या  घरट्याचं  अंगण  फारंच  छोट्ट,
तिच्यासाठीच   खर्च  करीन  सुख्ख  माझी  सारी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

मोठी  होऊन जेव्हा  मिळवत  राहील  यश,
गर्वाने  सांगेल  "maza   baba   is   the   बेस्ट",
आयुष्याची सार्थकता  तेव्हाच  होईल  खरी,
आज  मनामध्ये  वाटतंय  जाम  भारी.

........अमोल

Wednesday, September 14, 2011

बाजार


आपल्या  देशात  दारू बंदी  होत नाही कारण  सरकारला  त्यातून revenue  मिळतो हे  जरी  मान्य  केले, तरी प्रश्न  हा पडतो कि  शरीविक्रय करायला  लावणाऱ्यांची  दुकानं  का  बंद  होत  नाहीत  त्यातून सरकारला  काय  मिळतं ? हे  तर  उघड  सत्य  आहे कि  यात  कितीतरी   पांढरपेशा  पांघरलेल्या  समाजातलीसुद्धा   लोकं  दलालीवर  पोट  भरत आहेपण  याच  पायी  भारताच्या  खूप खूप  गरीब गावांतून लहान मुली, तरुणी  आणल्या  जातातबाजार  असला कि  खरेदी  विक्री  होणारच. पण जर का  बाजारच  बंद  केला  तर निदान  ज्यांची  इच्छा  नाहीये  ( असं काम करायची मुळातच कुणाची इच्छा नसतेच) तर त्या   तरी  वाचतील. हे जरी आपल्याला  वाटत  असलं कि हि गंभीर  बाब  आहे तरी पण फार मोठ्या  प्रमाणात यात शासनाने लक्ष घालायला  हवे, पण ज्यांनी लक्ष घालायचे  त्यांना  भ्रष्टाचार,  scam  , घोटाळे, खुर्ची बचाव अश्या  कामांपासून वेळ  भेटेल तर हेही  होईल कि.


हात  पाय  बांधलेले  तोंडात  बोळा  कोंबलेला,
सुन्न थरार  रात्र  अनखोलीत  अंधार  तुंबलेला.

हा  काय  माझा  गुन्हा  का  रंग  माझा  वेगळा,
मोकळ्या  अंगास  माझ्या  वासनांध  स्पर्श  झोंबलेला.

जीव  देऊ  पहिला  पण  तोही कुठे  ताब्यात  होता?
वेदनेचा  अंत  बघण्या  काळ  हि  खोळंबलेला.

हात  पाय  सोडून  त्यांनी रस्त्यावरी फेकले,
ओळखींच्यापैकी  कुणी  नव्हता तिथे  थांबलेला.

बंद  दाराने  घराच्या  सांगितले  सर्व  काही,
सहानुभूतीचा  हात  परका  वाटला  आंबलेला.

नाही  राम  वा  कृष्ण  कोणी  लाज  माझी  राखणारा,
बेअब्रूचा  डाग  माझ्या  अब्रूवरी  लोंबलेला.

केव्हा  पासून  मन  मारून  जगते  आहे  कसेतरी,
आणि  जगेन  जोवरी  आहे  आत्मा शरीरी  डांबलेला.

......अमोल

Wednesday, September 7, 2011

आता तुटली रे नाळ.


हि कविता त्या कोणी एकाची जो कोणी फार दूर निघून गेला बरंच काही मिळवण्यासाठी,
आणि इतका दूर झाला कि काहीच नाही उरलं पाठी पुन्हा स्वतःच असं गमावण्यासाठी. 
.
.
.
.


इथे नाही वेळ कुणा,
बोलण्यासाठी क्षणभर सुद्धा,
परकी सारी नाती,
आणि परका हा देश सुद्धा,
खोट्या खोट्या ऐश्वर्यासाठी,
सुटले स्वतःचे आभाळ,
आता तुटली रे नाळ.

नाही इथे प्रेम मिळत,
मिळतो फक्त पैसा,
खरी आपुलकीस मुकलो,
जसा जला विना मासा,
सारे मोठे शामियाने,
पण नात्यांची आबाळ,
आता तुटली रे नाळ.

इथे नाही सणवार,
नाही सुखदुखाना आकार,
वास्तव सारे विसरलो,
करताना स्वप्नां साकार,
मनी उरतो फक्त,
एक आठवणींचा गाळ,
आता तुटली रे नाळ.

परतीचे ढग आता,
खुणावतात पुन्हा,
पण देशी जाऊन सुद्धा,
नांदतो जसा पाहुणा,
कुणी नाही उरले तिकडे,
म्हणण्यासाठी बाळ,
आता तुटली रे नाळ.
परतताना पुन्हा पुन्हा,
ओलावतात डोळे,
वाटते कुणी थांबवावे,
पायात येतात गोळे,
पण कुणी नसतं निरोपासाठी,
कुणी म्हणंत नाही सांभाळ,
आता तुटली रे नाळ.

इथेच खितपत पडायचे,
सांभाळायचे इथलेच संस्कार,
दुरूनच करायचा रोज,
स्वतःच्या देशाला  नमस्कार,
सातासमुद्रा पलीकडूनच,
घालायची देवालाही माळ,
आता तुटली रे नाळ.

................अमोल

Friday, September 2, 2011

एका संगीत सूर्याचा अस्त

आज सकाळी  श्रेष्ठ संगीत दिग्दर्शक श्री श्रीनिवास खळे यांचे ठाण्यात त्यांच्या राहत्या घरी दुखद निधन झाले.  ज्यांनी  इतकी सुंदर  गाणी देऊन आपला  आत्मा  जीवंतपणी शांत केला  त्यांच्या  शांती साठी  आपण प्रथांना करण्यास असमर्थ आहोत.
 
.
.
.
.
मैफिल  सजली  असेल  खुद्द   स्वर्गात  आज,
खळे  काकांबरोबर  रमले  असतील  साक्षात  इंद्रराज. 
संगीत रचना ऐकुनी होतो ज्यांच्या हरवलो,
आज  मात्र  त्या  तपस्वी  संगीतकारास  मुकलो.
 
.
.
.
त्यांच्याबद्दलची काही माहिती खाली दिलेल्या लिंकवर वाचता येईल.
 
 

Sunday, August 28, 2011

नववधू स्वागत गीत


का  लाजतेस   साजणी  नुसतेच हासतेस साजणी,
हे  घर  तुझे,  मी  हि  तुझा,  तू  साऱ्याची   स्वामिनी,
का  बावरते  अशी, कोणी  ना परके  तुला या  क्षणी.

अग्नीब्राम्हण   साक्षी ठेउनी, पूर्वजांचा   मान  राखुनी,
थोरांचा   आशीर्वाद   घेउनी हे  जुळले नाते घे  जाणुनी,
सुवर्णअक्षतांत न्हाउनी, वेद मंत्रांच्या पठनातुनी,
एकरूप  झाली हि  दोन  शरीरे  कुलदैवतेस  स्थापुनी,
सनई  चौघड्यांच्या  तालास्वरात  सुहासिनीनी  ओवाळूनी ,
तू  आलीस  या  घरात    मंगल  कलश  ओलांडूनी,
तरी  मग   का  लाजतेस   साजणी  नुसतेच हासतेस साजणी.

या  अबोल ओठंना  सांग  बोलायला   काहीतरी,
या शालीन  नजरेला  सांग  निरखायला  काहीतरी,
किती   वेळ   अंगठ्याने   रेखाटशील  नक्षी,
आता  तरी  उडू  देत  तो  लाजेचा  पक्षी,
न्याहाळ  हे   घर  नवे  ज्याचे   मंदिर  तुला  करायचे,
आणि  रंग  भरायचे  काढून  रांगोळी  अंगणी,
का  लाजतेस   साजणी  नुसतेच  हासतेस साजणी.

















होते   सुखाची  छनछन,वाजता  तुझा  पैंजण.
नको  मानुस  याला  बंधन, माझे आकाश  दिले  तुला  आंदण.
हि गाठ  असे  पवित्र, जिचे  नाव  मंगळसूत्र.
हि  माळ  ना  धाग्याची, हि  माळ  सौभाग्याची.
हा  ना तुझा  दागिना, असे  माझ्या  अस्तित्वाच्या खुणा.
हे  ना  नुसते  मनी, हि  सात  जन्माची बांधणी.
का  लाजतेस   साजणी  नुसतेच  हासतेस साजणी.

तू   कामना,   स्वच्छ   वासना,  श्वासांतील  रागिणी,
तू  कामिनी,   तू  मोहिनी,  तू  शुद्ध  वैरागिनी,
चित्ताचे   रूप   तूआत्म्याचे   स्वरूप   तू,   तू  रुपाची  यौवनी,
तूच  अर्थतुच  स्वार्थमाझा  सर्वार्थ  हि  तुझ्यातुनी
तुझ्याच   ओटीत  मी  अर्पितो हे  घर   प्रिय  प्राणाहूनी,
मीच  माझा    राहिलो  सर्वस्व  तुला  अर्पुनी.
का  लाजतेस   साजणी  नुसतेच  हासतेस  साजणी.

...अमोल